पुणे : बहुजननामा ऑनलाईन – जाती-धर्मावरून राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात वाद असून जाती-धर्माच्या नावाने घाण पसरली आहे. आम्हाला चित्रपट दाखवा, तो मान्य असेल तरच प्रदर्शित होईल, हा गाढवपणा देशात सुरु आहे. सरकारी सेन्सॉरशिप असताना या खासगी सेन्सॉरशिपची आवश्यकता नाही. पुण्यात १८ वे पिफ महोत्सव सुरु असून त्यात त्यांना डिस्टिंग्विश्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दरम्यान महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल हे पण उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या मुलाखतीमध्ये बोलताना विक्रम गोखले बोलत होते. आपण सगळेच दहशतवादी झालो आहोत, असेही विक्रम गोखले म्हणाले. ‘१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्याला आता ६० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताचा विचार केला तर महाराष्ट्र हे राज्य सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न आणि अग्रेसर आहे. पण सोबतच याच राज्यात खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टी आणि या क्षेत्रातील दादासाहेब फाळके यांसारखे प्रणेते देखील जन्माला आले. इतकेच नव्हे तर चित्रपट सृष्टीचा विस्तार देखील याच राज्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. म्हणूनच राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन आम्ही यावर्षीच्या महोत्सवात घडविण्याचा प्रयत्न करत आहोत, असे डॉ. जब्बार पटेल म्हणाले.