नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतक-याचे आंदोलन हे चीन आणि पाकिस्तान या देशाकडून पुरस्कृत असल्याचे विधान भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. याबाबत बोलताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar ) यांची जीभ घसरली. दानवे म्हणजे भैताड, एकदम येडपट माणूूस असल्याचे म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले हा भैताड माणूस राजकारणात कसा आला हेच कळत नाही. बर आला तर आला भाजपने याला प्रदेशाध्यक्ष, मंत्री करून टाकला. ज्याला परिस्थितीचे गांभीर्य नाही, बोलण्याचे भान नाही, अशा माणसाला मंत्री करणे म्हणजे त्या पक्षाच्या विचारधारेवरच प्रश्नचिन्ह आहे. हा माणूस काहीतरी शोध लावत असतो. कार्टून माणूस, इब्लीस माणूस जे करतो तेच काम दानवे करीत असल्याचे ते म्हणाले. कृषीप्रधान देशात जो शेतक-यांचा अनादर करतो त्याला मंत्री करणे म्हणजे त्या पक्षाच्या दिवाळखोरीचे लक्षण आहे. दानवेला या विधनाचे परिणाम भोगावे लागतील, असेही वडेट्टीवार म्हणाले.
बच्चू कडूंनी तर म्हटले आहे की, दानवेला घरात घुसून मारले पाहिजे. केंव्हा काय बोलावे याचे भान दानवेला राहिले नाही, कीव येते भारतीय जनता पक्षाची अशा लोकांना प्रदेशाध्यक्ष, केंद्रात मंत्री केले. या पक्षाची काही विचारधारा आहे की नाही, असेल तर कुठल्या थराला गेली आहे. याची कल्पना दानवेच्या वक्तव्यावरून येते, असे वडेट्टीवार म्हणाले.