पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – हराळी येथील अल्पवयीन अनाथ मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले. त्यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून आंदोलकांनी आरोपींची सीबीआय चौकशी करुन कडक शिक्षा करावी, अशी मागणी केली.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार, मारुती भापकर, सुनील साळुंके, पांडुरंग प्रचंडराव, रफिक कुरेशी, साहेबराव साळुंके, किरण माने, अशोक सातपुते, निलेश मुसळे, सुरज साळुंके, डॉ.सहास जगदाळे, धनंजय घावटे, केशव पाटील, सतिश काळे, सतीश घावटे, मोहसिन शहा, तेजस गवई, रफिक सय्यद, श्रीहरी रसाल, अक्षय मरबे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, सध्याची परिस्थितीत देशभरातील महिला असुरक्षित असून कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. हराळी येथील घटनेत आरोपींना पाठीशी घातले जात आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण हा प्रकार शिक्षकी पेशाला आणि शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारा आहे. तसेच, या संस्थेला वस्तीगृहाची मान्यता नसताना शेकडो अनाथ आणि निराधार त्या ठिकाणी आहेत. यामुळे या घटनेतील आरोपींना कडक शासन करावे अन्यथा हराळी येथील अल्पवयीन अनाथ मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे.