औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन- औरंगाबाद महापालिकेच्या जेवणावर लाखो रुपये खर्च होतात. त्यामुळे जनतेच्या पैशावर सुरु असणारी जेवणं बंद करावीत अशी मागणी एमआयएमचे नगरसेवक इम्तियाज जलील यांनी काही दिवसापूर्वी केली होती.
या विषयाला अणुसरुन एमआयएमच्या नगरसेवकांनी महापालिका सर्वसाधारण सभेच्या जेवणावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांनी जेवणाचे डबे आणून विरोधी पक्षनेते सरिता बोर्डे यांच्या आफिसमध्येच एकत्र जेवण केलं. जनतेच्या पैशावर सुरु असलेली जेवणं बंद करावीत आशी टीकाही त्यांनी केली आहे.