बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदयाविरोधात सुरु असलेले शेतकरी आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश असून त्यांना मन की बात ऐकवण्यापेक्षा शेतकऱ्यांची मन की बात ऐकायला हवी असा सल्लाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe)यांनी थेट पंतप्रधानांना दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनाबाबत केंद्राने जी असहिष्णुता दाखवली ती निषेधार्ह आहे, अशा शब्दात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
खासदारकोल्हे पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शेतकरी आंदोलनाचा आज 61 वा दिवस आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यात आतापर्यंत तब्बल 11 चर्चेच्या फेऱ्या झाल्या पण त्यातून काही तोडगा निघाला नाही. उद्या प्रजासत्ताक दिनी शेतकरी ‘किसान गणतंत्र परेड’ अशी ट्रॅक्टर रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे ट्रॅक्टर परेडला परवानगी नाकारण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत होते. सरकार परवानगी देवो अगर न देवो, आम्ही ही परेड काढूच, असा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. मात्र, अखेर दिल्ली पोलिसांना या परेडसाठी परवानगी द्यावी लागली आहे.
https://wp.me/pb09b8-1BtI