बहुजननामा ऑनलाईन – वास्तुशास्त्रानुसार, घरात अनेक वस्तू अशा असतात ज्या घरात सकारात्मकता कायम ठेवतात. तर, अनेक वस्तू अशा असतात ज्या घरात नकारात्मक उर्जा निर्माण करतात. यामुळे घरात भांडणे होतात. सोबतच अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. अनेकदा असे होते की, नकळत आपल्याकडून असे वास्तुदोष होऊन जातात. वास्तुदोषामुळे नकारात्मकतेचा प्रवाह होऊ लागतो. वास्तुशास्त्रानुसार, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ अतिशय उपयोगी मानले जाते. आज आम्ही मीठाचे काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे जीवनातील समस्या दूर होऊ शकतात.
1. जर तुमच्या घरात पैशाची तंगी आहे तर एका काचेच्या वाटीत थोडे समुद्र मीठ आणि चार ते पाच लवंग घ्या. नंतर हे घरातील एखाद्या कोपर्यात ठेवा. असे केल्याने घरात सकारात्मकता संचार करते. याशिवाय धनसंबंधी समस्यांपासून मुक्ती मिळते.
2. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमुळे उदास वाटत असेल तर पाण्यात थोडे मीठ मिसळ आणि त्याने आंघोळ करा. यामुळे सर्व नकारात्मक उर्जा दूर होते. यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या ताजेतवाने वाटेल.
3. जर तुमच्या बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर एका काचेच्या वाटीत थोडे मीठ आणि पाणी टाका. नंतर बाथरूमच्या एका कोपर्यात ठेवा. यानंतर 15 दिवस किंवा एका आठवड्याने हे मीठाचे पाणी बदला. लक्षात ठेवा हे कुणालाही दिसता कामा नये. यामुळे बाथरूमची नकारात्मक उर्जा दूर होते. सोबतच मानसिक शांतता प्राप्त होते.