पाथर्डी : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडी ही मॅनेज होणारी नाही तर डॅमेज करणारी आघाडी आहे. हे लोकसभा निवडणूकीत सिध्द झाले आहे. येत्या विधानसभेत शेवगाव पाथर्डी मतदारासंघात प्रस्थापितांना धक्का देणारा निकाल असेल असे मत वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या महासचिवपदी त्यांची निवड झाल्यानंतर चव्हाण यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
यावेळी प्रा. किसन चव्हाण म्हणाले, गेल्या ७० वर्षांपर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या भाड्याच्या घरात सर्व बहुजन राहात होते. आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्हाला हक्काचे घर मिळाले आहे. हे घर कसे मजबूत राहिल तसेच शाबुत राहिल यासाठी आम्ही पुढील काळात करणार आहोत. सर्व सामान्य माणूस सत्तेत गेला पाहिजे याचे स्वप्न प्रकाश आंबेडकर यांनी पाहिले आहे. ते पुर्ण करायवयाचे असल्याचे ते म्हणाले.