लखनऊ : वृत्तसंस्था – भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये सामील झालेल्या सावित्रीबाई फुले यांनी आता काँग्रेसचाही हात सोडत नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे मागच्या काही दिवसांपूर्वी विधान केले होते. काँग्रेसचा राजीनामा देताना फुले म्हणाल्या की, काँग्रेस पक्षामध्ये आपला आवाज कोणी ऐकत नव्हते त्यामुळे आपण हा राजीनामा देत आहोत.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि आपले वैचारिक मताला घेऊन मतभेद आहेत. सावित्रीबाई फुले यांनी नुकतीच कांशीराम बहुजन समाज पक्षाची स्थापना केली आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्ती ला घेऊन आपण पुढे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील संविधान,आरक्षण, अडचणीत असल्याचेही फुले यांनी बोलताना सांगितले.