लखनऊ : वृत्तसंस्था – केंद्रीय तपास यंत्रणेने (उइख) उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये 14 सप्टेंबरला दलित तरूणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेचा तपास आपल्या हातात घेतला आहे आणि या संबंधी एफआयआर दाखल केला आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये आरोपी म्हणून सध्या संदीपचे नाव आहे, परंतु या केसमध्ये गँगरेपचे कलम जोडण्यात आले आहे. अधिकार्यांनी सांगितले की, एजन्सीने रविवारी सकाळी भारतीय दंड विधानच्या सामूहिक बलात्कार आणि खूनाशी संबंधीत कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. यापूर्वी मृताच्या भावाच्या तक्रारीवर हाथरस जिल्ह्याच्या चंदपा पोलीस ठाण्यात या घटनेसंबंधी प्रकरण दाखल केले गेले होते.
सीबीआयचे प्रवक्ते आर. के. गौड यांनी सांगितले की, तक्रारदाराने 14 सप्टेंबरला आरोप केला होता की, आरोपींनी बाजरीच्या शेतात त्याच्या बहिणीचा घळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर प्रदेश सरकारच्या विनंतीनुसार आणि त्यानंतर भारत सरकारच्या अधिसूचनेनंतर सीबीआयने यासंबंधी प्रकरण नोंदवले आहे. त्यांनी सांगितले की, तपासासाठी एजन्सीने एका पथकाची स्थापना केली आहे.
सामुहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षांच्या दलित तरूणीचा दिल्लीतील सफदरजंग हॉस्पीटलमध्ये 29 सप्टेंबररोजी मृत्यू झाला होता. अजूनपर्यंत हाथरस कांडचा तपास एसआयटी करत होती. नुकताच हा तपास पूर्ण करण्यासाठी युपी सरकारने आणखी दहा दिवसांची वेळ एसआयटीला दिली होती. असे मानले जात आहे की, लागोपाठ गुंतागुंत वाढत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला, परंतु आता हे प्रकरण सीबीआयकडे गेले आहे.