मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – १ जून २००९ साली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका सुरु झाली होती. या मालिकेने २०१४ पर्यंत लोकांचे मनोरंजन केले. ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका ठरली होती. आजही लोकांच्या मनात ‘पवित्र रिश्ता’ मालिकेबद्दल तितकच प्रेम आणि आपुलकी आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. तसेच या मालिकेत सविता प्रभुणे, प्रिया मराठे, उषा नाडकर्णी, Usha Nadkarni किशोर महाबोले, प्रार्थना बेहरे हे कलाकार होते.
दरम्यान, आता या मालिकेचा सीक्वल म्हणजेच भाग २ येणार असल्याचे समजते. ‘पवित्र रिश्ता २’ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे पाहायला मिळणार आहे. मानवच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरु आहे. या मालिकेतील उषा नाडकर्णी Usha Nadkarni यांचा अभिनय सर्वांनाच खूप आवडतो. उषा नाडकर्णी या मराठी इंडस्ट्रीत खाष्ट सासूच्या भूमिकेमुळे चांगल्याच प्रसिद्ध झाल्या. तसेच त्यांनी बिग बॉसमध्येही भाग घेतला होता. आजवर त्यांनी आपल्या अभिनयातून सर्वोतम भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हिंदी सृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयान वर्चस्व निर्माण केल. ‘पवित्र रिश्ता’मालिकेत त्यांनी सासूच्या भूमिकेचा दबदबा टिकवून ठेवताना दिसला. मात्र या सीक्वल मध्ये सर्वांची आवडती उषा नाडकर्णी दिसणार नसल्याचे समजते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. यावेळी मात्र त्यांना आपल्या सुरक्षितेसाठी माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्या मालिकेत काम न करण्याचा त्यांचा निर्णय योग्यच आहे.
उषा नाडकर्णी यांनी आपल्या वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यामुळे सुरक्षितेसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी ही मालिका करत नसल्याचे सांगितले. त्यांचे वय लक्षात घेता आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्या मालिकेत काम करणार नसल्याचे समजते. उषा नाडकर्णी यांना डायबेटीस आहे. त्यामुळे आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी ही मालिका करत नसल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांनी देखील त्यांना सध्याच्या परिस्थितीत काम न करण्यास सांगितले आहे.
‘नितीन गडकरी हे चुकीच्या पक्षात असलेले योग्य व्यक्ती’
खेड सभापती विरोधातील अविश्वास ठरावावर आज निर्णय; राजगुरूनगरमध्ये संचारबंदी
खळबळजनक ! हुकूमशहा किम जोंग उनचा संताप; बेकायदेशीर CD विकणाऱ्यावर 500 जणांसमोर झाडल्या 12 गोळ्या
CBSE, ICSE बोर्डाच्या 12 वी च्या परीक्षा होणार की नाही ?, विद्यार्थ्यांचे भवितव्य अद्याप अनिश्चित