मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप सरकार सतेत आल्यापासून देशात विकासापेक्षा जातीचे व धर्माचे (हिंदू-मुस्लिम) हिंसक वातावरण निर्माण केलं आहे. असा घणाघात नुकत्याच काँग्रेस पक्षात सामील झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने केला आहे. देशभक्ती किंवा धर्म काय आहे हे सांगणारा भाजप कोण आहे ? असा थेट सवालही उर्मिलाने मातोंडकर यांनी केला आहे.
खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावं असे म्हंटले जाते पण या ५ वर्षांमध्ये हे प्रेम कोणाला पाहायला कुठे मिळाले आहे? देशात विकास कुठे झाला ? फक्त देशात हिंसेला खतपाणी घातले गेले. विकासाचं चित्र कुठे आहे ? धर्म म्हणजे काय ? खरा देशभक्त कोण ? हे सांगणारे तुम्ही कोण ? तो काळा पैसा, नोकऱ्या कुठे गेल्या? असे अनेक प्रश्न उर्मिलाने उपस्थित केले. विकासाची स्वप्न दाखवली गेली. मात्र प्रत्यक्षात. खोठ्यावर खोटे बोलून देशातील जनतेचा निराशा केली आहे, असा घणाघातही उर्मिलाने केला.
महिलांचे प्रश्न, कर, बेरोजगारी, मराठी माणसांचा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचे विषय असल्याचं उर्मिलाने सांगितलं. धर्म-जात याआधारे विचारले जाणारे प्रश्न बिनबुडाचे आहेत. व्यक्ती कोण आहे. ती काय बोलते. हे महत्वाचं असल्याचं उर्मिला म्हणाली. निवडणुकांमध्ये प्रचार करुन विचारसारणी लोकांपर्यंत पोहचवणार असल्याचं उर्मिलाने सांगितलं.उत्तर मुंबईतून भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना तिकीट दिलं आहे. काँग्रेस शेट्टींविरोधात एका तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. त्यामुळेच उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे.