नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – युपीए सरकार सत्तेत असताना अनेक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते. परंतु, आम्ही कधीही लष्कराचे श्रेय घेतले नाही. शिवाय मते मिळवण्यासाठीही हा मुद्दा आम्ही कधी उपस्थित केला नाही. परंतु, मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय वापर करताना दिसत आहे . ही अतिशय शरमेची बाब असल्याची टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाष्य केलं.
सिंह म्हणाले ,२००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा युपीए सरकारनेही लष्कराच्या मध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा विचार केला होता. मात्र, त्यापेक्षा आम्ही पाकिस्तानला राजकीय पातळ्यांवर एकटे पडण्याचा प्रयत्न केला. व मुंबई हल्ल्यानंतर १४ दिवसांमध्ये लष्कर-ए-तोय्यबाचा म्होरक्या हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात यश आले. हाफिज सईदवर अमेरिकेने १० बिलियन डॉलरचे बक्षीसही जाहीर केले आहे.त्यासाठी यूपीए सरकारनंच प्रयत्न केले होते.
देशाचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र त्यांनी कधीही लष्कराचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. इंदिरा गांधी आणि शास्त्रींची सध्याच्या पंतप्रधानांशी तुलनाच होऊ शकत नाही, कारण मोदी आर्थिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.पुन्हा युपीए सरकार सत्तेत आल्यास पंतप्रधान व्हायला आवडेल का, यावर बोलताना म्हणाले कि आता देशाचे नेतृत्व तरुण लोकांकडे सोपवण्याची वेळ आली.