मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – हैदराबाद येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काउंटरनंतर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी तेलंगण पोलिसांचं कौतुक केलं आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी यातून धडा घ्यावा असंही मायावती यांनी म्हटलं आहे. महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे.
मायावती म्हणाल्या की, उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचारांत सतत वाढ होत आहे. मात्र, राज्य सरकार झोपलं आहे. खरंतर, तेलंगणच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईपासून उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या पोलिसांनी प्रेरणा घ्यायला हवी. मात्र, यूपीमध्ये जंगलराज आहे. इथं गुन्हेगारांना सरकारी पाहुण्यासारखी वागणूक दिली जाते, हे दुर्दैव आहे,’ अशी खंत मायावती यांनी व्यक्त केली.
माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी देखील एन्काउंटरच्या कारवाईचं स्वागत केलं. उमा भरती म्हणाल्या की, ‘ज्या क्रूरतेनं दिशाचा बळी घेतला गेला होता, ते पाहता तिच्या कुटुंबीयांचं दु:ख कधीच कमी होणार नाही. पण देशातील इतर मुलींच्या मनातील भीती नक्कीच कमी होईल,’ व तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे ही चिंतेची बाब आहे. सर्व सरकारांनी मिळून याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. देशातील न्यायव्यवस्था अधिक सुदृढ बनविण्यासाठी तात्काळ पावलं उचलली जायला हवीत.
Visit : bahujannama.com