बहुजननामा ऑनलाइन टीम – अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे डिसेंबर महिन्यात संसर्गजन्य (risk of infectious )आजारात वाढ होणार असून कोरोनाचा संसर्ग असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
गेल्या काही दिवासापासून मधूनच कधी कडाक्याची थंडी जाणवते तर कधी वातावरण ढगाळ होऊन पाऊस पडतो. कडक ऊन असतानाही हवेत गारवा जाणवतो. बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे साथीचे म्हणजेच संसर्ग आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि मळभट वातावरणामुळे अंग मोडून पडणे, अनुत्साही वाटणे, डोकेदुखी अशा आजारात वाढ झाली आहे.
याबाबत अॅपेक्स रुग्णालय समुहाचे डॉ. जिग्नेश पटेल म्हणाले की, अचानक वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारावर वेळीच उपाय केले नाही, तर ते आजार बळावण्याची शक्यता असते. सकाळी थंडी, दुपारी पडलेल्या उन्हामुळे नागरिक विशेषतः लहान मुले तहान भागवण्यासाठी शितपेय मोठ्या प्रमाणात सेवन करतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, कफचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांना
आईस्क्रीम,शितपेय देणे टाळावे.
तर वैद्यकीय अनुमानानुसार भारतात हिवाळ्यात श्वसनासंबधी आजार वाढीस लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लू आणि दम्याचे आजार या काळात वाढीस लागतात. म्हणून ज्या नागरिकांना कोरोना झाले आहे, अशा नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे ज्येष्ठ फिजिशियन डॉ, प्रवीण भुजबळ म्हणाले.
बदलेल्या वातावरणाचा परिणाम
या बदलेल्या वातावरणामुळे मानसिक अस्थैर्य निर्माण होत असून नैराश्य, चिडचिडेपणा, डिप्रेशन आदी गोष्टी नागरिकांमध्ये बळावत आहेत. दमट वातावरणामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये बीपी कमी होऊन सातत्याने घाम येणे, दम लागणे, अशक्तपणा आदीसारखे विकार उद्भभवत आहेत. त्यामुळे काम असले तरच घराबाहेर पडावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.