मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Unseasonal Rain In Maharashtra |अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड (Nanded Collector), नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी (Nashik Collector) संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं (Farmers In Maharashtra) सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत दिली. (Unseasonal Rain In Maharashtra)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा आज सकाळी विधानसभेत उपस्थित केला, त्यावर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. (Unseasonal Rain In Maharashtra)
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात काल नांदेड आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे,
त्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे (Panchnama) करण्याच्या सूचना दिल्या आहेत,
त्यानुसार आज अर्धापूर आणि मुदखेड (Mudkhed) या तालुक्यात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत
पंचनामे करण्याचे काम सुरु आहे तर नाशिक जिल्ह्यात देखील नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत.
या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला (Shinde-Fadnavis Govt) प्राप्त होईल.
गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत,
असे सांगून कालपासून ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, त्या भागात देखील पंचनामे सुरु असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Unseasonal Rain In Maharashtra | Farmers will not be left in the wind; Panchnama of damage due to unseasonal rains started – Chief Minister Eknath Shinde
हे देखील वाचा :