बहुजननामा ऑनलाइन टीम : उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेले आमदार कुलदीपसिंग सेंगर यांना 20 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात सेंगर यांच्या शिक्षेवर सुनावणी झाली. यावेळी सीबीआयने दोषी कुलदीप सेंगर यांना जन्मठेपेची मागणी केली. सीबीआयने यावेळी सांगितले की, हे प्रकरण केवळ बलात्काराबद्दल नाही तर ते मानसिक छळाचे ही आहे. कोर्टाने सीबीआयला विचारले की, अशा प्रकरणांमध्ये आतापर्यंत किती नुकसान भरपाई पीडितेला दिली गेली. या दरम्यान सीबीआय म्हणाले की, आम्ही याची पाहणी करत आहोत की, पीडितेला किती नुकसान भरपाई मिळते.
2017 Unnao rape case: Delhi's Tis Hazari Court adjourns the arguments on quantum of punishment for 20th December and also seeks the copy of affidavit of Former BJP MLA Kuldeep Singh Sengar filed during 2017 in Election Commission. pic.twitter.com/kIPJfF8p76
— ANI (@ANI) December 17, 2019
सेंगर यांच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, ते 54 वर्षाचे आहे आणि जर त्यांची संपूर्ण कारकीर्द पाहिली तर 1988 पासून ते आतापर्यंत पब्लिक डीलिंग करत आहेत. 1995 ते 2000 या काळात ते ब्लॉक स्तराचे सदस्य होते. त्यांनी नेहमीच लोकांची सेवा केली आहे. सन २००२ पासून त्यांनी लोकांच्या मागणीवरुन सतत निवडणूक लढविली आणि ते आमदार झाले. आपल्या क्षेत्रात अनेक संस्था स्थापन केल्या, त्याचबरोबर विकास कामे केली. तसेच जनतेने सेंगर यांच्यावर कधीही आरोप केला नाही असे वकीलाने म्हटले आहे. ही पहिली घटना आहे. त्यांना दोन मुली देखील आहेत. त्यांचे लग्न झाले नाही म्हणून त्यांना कमी शिक्षा झाली पाहिजे.
सोमवारी कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये सेंगर यांना दोषी ठरवले होते. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी शशी सिंग याला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. नोकरी मिळण्याच्या बहाण्याने त्याने पीडित मुलीला कुलदीपसिंग सेंगरकडे नेले आणि त्यानंतर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप शशीसिंग यांच्यावर होता. कुलदीप सेंगर यांच्यावर दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टात आणखी तीन खटले सुरू आहेत. सध्या सेंगरला बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. सेंगरला 14 एप्रिल 2018 रोजी अटक करण्यात आली होती. कोर्टाने या प्रकरणात शशी सिंग यांना आपल्या ताब्यात घेतले होते. मात्र, शशीसिंगविरूद्ध पुरेसे पुरावे नसल्यामुळे कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे. सोमवारी कोर्टाने आपला निकाल देताना म्हटले आहे की, सन 2017 मध्ये जेव्हा हा विषय आला तेव्हा पीडित अल्पवयीन होती. या घटनेनंतर ती घाबरली होती आणि तिला सतत धमक्या येत होत्या. तिच्या कुटुंबाचा जीव धोक्यात आला होता. कोर्टाने म्हटले आहे की, ती एका पावरफुल व्यक्तीशी भांडत होती आणि यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबावर बनावट केसेस देखील लादण्यात आले.
Visit : bahujannama.com