नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलिकडील काळात कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. दररोज कांद्याच्या दरात वाढ होत आहे. आज (रविवार) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांद्याच्या निर्यातीवर तात्काळ बंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कांद्याचे दर अटोक्यात येण्याची दाट शक्यता असून कांदा स्वस्त होईल अशी अपेक्षा आहे. कांद्याच्या दरासंदर्भात यापुर्वीच राम विलास पासवान यांनी मोठी घोषणा करत कांद्या लवकरच स्वस्त होईल असे सांगितले होते.
Union Ministry of Commerce & Industry: Export policy of Onion is amended from free to prohibited till further orders. Hence, export of all varieties of onions is prohibited with immediate effect pic.twitter.com/MHNLqIPB2J
— ANI (@ANI) September 29, 2019
दिल्ली सरकारनं तर कांदे 24 रूपये किलो दराने मिळतील असं सांगितलं होतं. दिवसेंदिवस कांद्या महाग होत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या डोळयातून अक्षरशः पाणीच येत होते. सणासुदीत देखील कांद्याचे दर कडाडलेलेच राहतील अशी शक्यता वर्तविण्यात आली असतानाच आज (रविवार) अचानकपणे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. शेतकर्यांकडे एकदम कमी प्रमाणात कांदा शिल्लक असल्याने भाव वाढला असं सांगण्यात येत होतं. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
Visit : bahujannama.com