चंदीगड : वृत्तसंस्था – पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवण्यातच पाकिस्तानचं हित आहे कारण अनेक वृत्तांमधून असं समोर आलं आहे की, तेथील लोक पाकसोबत खुश नाहीत आणि त्यांना भारताचा हिस्सा बनायचं आहे असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑप इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी केलं. शुक्रवारी ते चंदीगडमध्ये बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले की, “नरेंद्र मोदी हे जोशीले पंतप्रधान आहेत. त्यांनी कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. परंतु पाकिस्तानला हे पचत नाही. पाकने काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याचा पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न केला. पाकने आता पाकव्याप्त काश्मीर आम्हाला द्यायला हवा. कारण असे करण्यातच पाकिस्तानचे हित आहे.”
पुढे ते म्हणाले, “जर पीओके आम्हाला दिला तर आम्ही तेथे अनेक नवीन उद्योद सुरू करू. आम्ही पाकिस्तानच्या व्यापारात मदत करू आणि गरीबी तसेच बरेरोजगारीशी लढण्यातही सहकार्य करू. असे वृत्त आहेत की, पीओकेमध्ये लोक खुश नाहीत आणि त्यांना भारताचा हिस्सा व्हायचं आहे.”आठवले म्हणाले की, “युद्धात उन्माद पसरविण्यात पाकिस्तानने सहभागी होऊ नये तसेच पोकळ धमक्याही देऊ नये.” त्यांची पार्टी हरियाणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही असा प्रश्न विचारल्यानंतर आठवले म्हणाले की, “90 पैकी 10 जागांवर लढणार आहोत” असे ते म्हणाले. याशिवाय आम्ही काँग्रेसविरुद्ध लढणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.