नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Unicef New Report | भारतासह जगातील 1 अरबपेक्षा जास्त मुलांवर (1 billion children) जलवायु परिवर्तनाच्या धोक्याचे (risk of climate change) सावट आहे. युनिसेफच्या एका नवीन रिपोर्ट (UNICEF New Report) नुसार, भारत (India) त्या चार दक्षिण आशियाई देशांमध्ये सहभागी आहे, जिथे मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षेवर जलवायु परिवर्तनाच्या प्रभावाचा सर्वात जास्त धोका आहे. रिपोर्टनुसार भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानवर (India, Pakistan, Bangladesh and Afghanistan) जलवायु परिवर्तनाचे संकट सर्वात जास्त (most affected) आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये भारत 26 व्या स्थानावर
युनिसेफ (UNICEF) द्वारे मुलांवर केंद्रित क्लायमेट रिस्क इंडेक्स (सीसीआरआय) (Child Focused Climate Risk Index) सुद्धा जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतासह या देशांना जलवायु परिवर्तनाच्या बाबतीत सर्वात जास्त जोखिम (पूर, वायु प्रदूषण, चक्रीवादळ, उष्ण वारे) असलेल्या देशांमध्ये समावे केला आहे. याचा यादीत भारताचे स्थान 26वे (india ranks 26th) आहे, तर पाकिस्तान 14व्या, बांगलादेश 15व्या आणि अफगाणिस्तान 25व्या स्थानावर आहे.
कोरोनाने समस्या आणखी वाढवली
रिपोर्टनुसार जगभरात जवळपास प्रत्येक मुलास कोणत्या ना कोणत्या जलवायु आणि पर्यावरणशी संबंधीत धोक्याचा सामना करण्यास भाग पडत आहे. तर, अनेक देशांमध्ये तर एकाच वेळी अनेक धोक्यांचा सामना करत आहेत. हा त्यांचे जीवन आणि विकासासाठी गंभीर धोका आहे. कोविड-19 महामारीने ही समस्या आणखी वाढवली आहे.
उच्च जोखिम असलेल्या 33 देशात जगातील निम्मी मुले
रिपोर्टनुसार जगातील सुमारे निम्मी मुले ज्यांची संख्या 1 अरबपेक्षा जास्त आहे. ते जलवायु परिवर्तनच्या उच्च जोखिमीच्या 33 देशांमध्ये राहतात.
या मुलांना स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य देखभाल सारख्या आवश्यक सेवा सुद्धा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. यामुळे त्यांचे जीवन जोखमीचे झाले आहे. जसजसा जलवायु परिवर्तनाचा परिणाम वाढेल त्यांच्यावर जोखिम वाढत जाईल.
भारतात 60 कोटी मुले गंभीर जल संकटात
रिपोर्टमध्ये आलेल्या गंभीर आकड्यांनुसार आगामी काळात भारतात 60 कोटीपेक्षा जास्त मुलांना
गंभीर जल संकटाला तोंड देण्यास भाग पडणार आहे. तर, जागतिक तापमानात दोन डिग्रीच्या
वाढीसह भारताच्या बहुतांश शहरांमध्ये अचानक पूर येण्याच्या घटना वाढतील.
भारतात प्रदुषित वायुची 21 शहरे
वायु प्रदूषणाच्या 2020च्या आकड्यांनुसार जगातील प्रदूषित वायु असलेल्या 30 मोठ्या शहरांमध्ये 21 शहरे भारताची आहेत.
Web Title : unicef new report unicef report 1 billion children of the world including india are at serious risk of climate change
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! लवकरच खात्यात येणार मोठी रक्कम, जाणून घ्या डिटेल