नवी दिल्ली : वृत्तससंस्था – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारवर विरोधकांकडून बेरोजगाराच्या मुद्दयावरून जोरदार टीका होताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बेरोजगारीवर प्रहार करत देशातील बेरोजगारीचा आकडा समोर आला आहे. सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) ने केलेल्या सर्वेनुसार देशातील बेरोजगारीचा दर एप्रिलच्या तीन आठवड्यांत ७.९ टक्क्यांवरून ८.० टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांतील हा बेरोजगारीचा उच्चांक आहे. सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी)ने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मोदी सरकारने लागू केलेल्या नोटबंदी, जीएसटीमुळे जवळपास ४ ते ५ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याचा अहवाल नुकताच समोर आला होता. यावरून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दाच विरोधी पक्षांनी बनविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी वर्षाला तब्बल दोन कोटी रोजगार देणार असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांच्या धोरणांमुळे रोजगार तर मिळालाच नाही उलट गेल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. आता या महिन्यातील बेरोजगारीचा आलेख चढला असल्याचे दिसून आले आहे.
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार NSSO च्या सर्व्हेमध्ये २०१७-१८ या वर्षात पुरुष कामगारांची संख्या २८ कोटी ६० लाखांवर आली आहे.
२०११-१२ मध्ये हीच संख्या ३० कोटी ४० लाख एवढी होती. तसंच २०११-१२ पासून आतापर्यंत एकूण ४ कोटी ७० लाख रोजगार कमी झाले आहेत. या रिपोर्टमध्ये शहरी आणि ग्रामीण भागाची वेगवेगळी आकडेवारीही देण्यात आली आहे. त्यानुसार शहरात बेरोजगारी दर ७. १ टक्के एवढा राहिला आहे तर ग्रामीण भागात हा दर ५. ८ टक्के एवढा आहे.