यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – सावित्रीबाईंनी दिलेल्या शिक्षणाचा व त्यांच्या कार्याचा उपयोग हा वास्तवात घडणाऱ्या परिणामांशी करावा. शिक्षणातून चिकित्सक बनावे. समाजातील अज्ञान व अंधश्रद्धा दूर करून महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाईंची सत्यशोधक चळवळ समजून घ्यावी असे प्रतिपादन विद्या राईकवार यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई स्मृती दिनानिमित्त ज्योती मंगल कार्यालय यवतमाळ येथे महिला प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
अध्यक्ष कमल खंडारे म्हणाल्या की, सिंधू संस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती असून इतिहासात अनेक शोधाची जननी स्त्रीच असताना जाती धर्माच्या नावाने तिचे शोषण आजही होते. कार्यक्रमात कवयीत्री मादेशवार, आदिती वैशाली फुसे यांचा सत्कार करण्यात आला. पाणी फाऊंडेशनचे रितू ठवकर यांनी अनेक जल रागिनींची ओळख व त्यांचे कार्य याबाबत माहिती दिली. शिवणी गावातील लोकांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून वर्षा गुजर, कल्पना लंगडे, शमीम बानो, जयश्री भगत, कुसुम शेगोकार, प्रेमा गिरी, सुनिता काळे, नम्रता खडसे, प्रमिला पारधी या उपस्थित होत्या. संचालन कल्याणी मादेशवार यांनी केले तर प्रास्ताविक अपर्णा लोखंडे यांनी केेले. यशस्वीतेसाठी माया गोरे, माधुरी फेंडर, संगीता डहाणे, नीता दरणे, अनिता गोरे, वैशाली फुसे, शोभना कोटंबे, वंदना डगवार, रेखा कोवे, विद्या भगत, वंदना डवले, कल्पना नागरीकर, सुनिता काळे यांचे सहकार्य लाभले. बीज भाषण नम्रता खडसे यांनी केले.