बहुजननामा ऑनलाईन टीम : उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. महत्वाचे म्हणजे शशिकांत शिंदेंनी उदयराजेंची अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, मित्राचे न ऐकल्यामुळे शिंदेंना अपयश आले. त्यामुळे निवडणुक काळात हे सख्खे मित्र एकमेकांचे वैरी बनल्यासारखे दिसून आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोडपट भूमिका पार पाडली. त्यामुळे दोघांचाही आपल्या-आपल्या मतदारसंघातून पराभव झाला. उदयनराजे खासदारकीला पराभूत झाले तर शशिकांत शिंदे आमदारकीच्या निवडणुकीत हारले. त्यामुळे निवडणुकीच्या काळात हे दोघे मित्र एकमेकांपासून दूर गेले होते.
निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांची पहिल्यांदाच लग्नसोहळ्यात भेट झाली. निवडणुकीच्या दीड महिन्यानंतर, शेंद्रे येथे एका लग्न सोहळ्याच्या निमित्ताने दोघेही समोरासमोर आल्यावर निवडणुकीतील ही दुश्मनी एका मिठीत सामावून गेली. निस्वार्थ मैत्री असलेल्या या दोन्ही नेत्यांच्या डोळ्यात अश्रु आल्याचे सर्वांना दिसले. विशेष म्हणजे उदयनराजेंनी शशिकांत शिंदेना मिठी मारत ‘आता सोडणार नाही’ असेही उद्गार काढले.
या भेटीमुळे राजकीय दुश्मनीपेक्षा पुन्हा मैत्रीच श्रेष्ठ असल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. या दोन्ही नेत्यांची गळाभेट सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना मैत्री जपण्याचा आदर्श घालून देणारी आहे. उदयनराजे आणि शशिकांत शिंदेच्या मैत्रीचा हा क्षण पाहून मुन्नाभाई एमबीबीएसमधील मुन्ना आणि सर्कीट यांच्या दोस्तीचा सीन आठवल्याशिवाय राहात नाही. जेव्हा अश्रू पुसणाऱ्या सर्कीटला मुन्नाभाई घट्ट मिठी मारून स्वत:ही डोळ्यातील पाण्याला गालावरुन ओघळून टाकतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसलेंच्या मैत्रीची चर्चा साताऱ्याच चांगली आहे. मात्र, पक्षनिष्ठेला वाहून घेतलेल्या शशिकांत शिंदेंनी उदयराजेंच्या पराभवासाठी मेहनत घेतली. तर कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदेंना पाडण्यासाठी उदयनराजेंनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला. निवडणुकांच्या या रणभूमित दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षनिष्ठेला प्राधान्य दिले. त्यामुळे दोस्त दोस्त न रहा… अशी परिस्थिती निवडणूक काळात दिसून आली होती.
Visit : bahujannama.com