मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता समीकरण काही तासात बदलत गेली. शिवसेनेला अखेर काँग्रेस हायकमांडकडून सत्तास्थापनेसाठी पाठिंबा जाहीर झाला. त्यामुळे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नावाला मुख्यमंत्रिपदासाठी सहमती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या संबंधित सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपचे नेते राजभवनावर गेले आहेत. आता काही तासाच गोड बातमी समोर येईल असे शिवसैनिकांकडून सांगण्यात येत होते. या दरम्यान चर्चा सुरु झाली ती मुख्यमंत्री कोण ? त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नावाला सहमती मिळाली आहे.
शिवसेनेच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांना सहमती दर्शवण्यात येत होत. त्याआधी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होते. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदासाठी तर अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदासाठी सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे काही तासात स्पष्ट होईल की नक्की मुख्यमंत्रिपदावर आणि उपमुख्यमंत्रिपदावर कोण बसतील. तसेच सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील असे देखील सांगण्यात येत आहे.
राज्यात सत्ता स्थापनेवर शिवसेना राष्ट्रवादी, काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करतील. त्याआधी शिवसेना प्रमुख्यांच्या मते शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार हे सांगण्यात येत होते आता हे सत्यात उतरले आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी सहमती दर्शवण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com