मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – अजित पवारांनी भाजपशी हात मिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेतली होती. मात्र नंतर राजकीय वर्तुळातील हालचालींना प्रचंड वेग आला होता अखेर अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचे समजते.अनेक दिवसांपासून शिवसेनेसाठी वारंवार पत्रकारपरिषदा घेऊन संजय राऊत यांनी मैदान गाजवलं होत. अजित पवारांनी राजीनामा देताच पाच वर्षांसाठी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार अशी गर्जना पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केली आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आता देवेंद्र फडणवीस याना जावेच लागणार आहे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठींब्याने पूर्ण पाच वर्षासाठी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे पहायला मिळाले होते.
अजित पवार ज्यावेळी भाजपसोबत गेले होते त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये एक गट असाही होता जो पक्षाला अजित पवारांची गरज आहे असे सांगत होता. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून देखील अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले होते.अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप सरकार आता कोसळणार हे जवळ जवळ निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे.
Visit : bahujannama.com