मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील आधुनिक अफजल खानाने मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला असून या गोष्टीवरूनच राज ठाकरे यांनी बोट ठेवल्याने जुलाब सामनातून बाहेर पडत आहेत, असे उत्तर मनसेचे संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना दिले आहे.
दोन दिवसांपूर्वीच मनसेचे पहिले महाअधिवेशन मुंबईत झाले असून झाले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मनसेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका केली गेली. त्यात वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येऱ्यागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा, अशी जबरदस्त टीका सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
त्यावर देशपांडे राऊत यांच्या घरी कमी शरद पवारांच्या घरीच जास्त असत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवण्याचे काम संजय राऊत करत आहेत, अशी टीका केली. देशाच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पुरावे देण्याचे आम्हीच बोललो असून मग आव्हान द्यायची गरज काय, असा प्रश्नही देशपांडे यांनी उपस्थित केला.