बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मतानुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. महायुतीला अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल हाती लागले आहे. त्यामुळे सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्या तरी भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करणं अशक्य आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला ५७ जागांवर विजय मिळाला आहे.
यावर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले कि, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता येतील इतक्या जागा महायुतीकडे आहेत. परंतु जागावाटपाच्या वेळी जी तडजोड करण्यात आली, ती यावेळी होणार नाही. त्यामुळे ५०-५० प्रमाणे मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्यात येईल. असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तर शिवसेनेच्या विजयी जागांमुळे हि निवडणूक एकतर्फी होणार असल्याचं बोललं जात होत, मात्र हि निवडणूक एकतर्फी झाली नसल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
Visit : bahujannama.com