बहुजननामा ऑनलाईन टीम – नेहमी शरद पवारांना गुरुस्थानी मानतो, राष्ट्रवादी सोडल्यानंतरही पवार माझ्या वडिलांसारखे आहेत, माझ्या मनात त्यांचा आदर कधीच कमी होत नाही असे कायम सांगणारे माजी खासदार आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले मात्र आज ईडीने पवारांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया चक्रावणारी होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, “या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं दुसरं काय ? दोनच दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी पवारांच्या आठवणी सांगताना त्यांना आश्रू अनावर झाले होते.
त्यावेळी ते म्हणाले होते की, जर का साताऱ्यातल्या पोटनिवडणुकीत शरद पवार उभे राहिले तर मी निवडणूक लढवणार नाही”. आणि आता त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. जेव्हा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो असे शरद पवारांना सांगितले, तेव्हा शरद पवारांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला. परंतु शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
शरद पवारांची पाठराखण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी ते म्हणाले, “या घोटाळ्यात शरद पवार यांचे नाव कधीही आले नव्हते, मग आता गुन्हा का दाखल करण्यात आला असा सवालही त्यांनी यावेळी केला.”शरद पवार यांना शिवसेनेनंही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यानंतर क्लीन चिट दिल्याने राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे. काँग्रेसने शरद पवारांना ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेतली आहे. याआधी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाने पुढे येत अशी थेट भूमिका घेतली नव्हती. यावर हे लक्षात येते की आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून सत्ताधाऱ्यांना आव्हान देणार आहे.
Visit : bahujannama.com