सातारा : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबत सर्वांचं लक्ष लागलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उदयनराजे भोसले यांचा प्रचंड मताने दारुण पराभव झाला. उदयनराजे यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी जवळपास ८७ हजार मतांनी उदयनराजे भोसले यांच्यावर विजय मिळवला. दरम्यान आपल्या पराभवांनंतर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी रडीचा डाव कधीच खेळत नाही. आदरणीय पाटील साहेब जिंकले हे खर आहे पण लोकसेवा काय केली हे लोकांनी पाहिले पाहिजे. मी खचणार नाही, यापुढे ही मी कार्यरत राहणार आहे,’ असं उदयनराजे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हंटल आहे.
https://twitter.com/AkshayShitole21/status/1187972067909459970
मात्र हा पराभव उदयनराजेंच्या जिव्हारी लागला असल्याचं म्हंटल जात आहे. उदयनराजे ज्या स्वभावासाठी, आक्रमकपणासाठी ओळखले जातात, त्यांचा तो स्वभाव कुठेतरी नमल्यासारखा पाहायला मिळाला. कारण राज्यातील उदयनराजे भोसले यांची लोकप्रियता आणि त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा असलेला पाठिंबा पाहता त्यांचा पराभव कठीण मानला जात होता. मात्र उदयनराजेंनी राष्ट्रवादीची सोडलेली साथ आणि भाजपची साथ लोकांना पसंत पडली नसल्यानं निवडणूक निकालातून दिसून आलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, ‘साताराच्या गादीबद्दल जनतेला आदर आहे. पण उदयनराजेंनी गादीची प्रतिष्ठा राखली नाही. मी उद्या इतर दौरे रद्द करून साताऱ्याला जाऊन राष्ट्रवादीचे उमेदवार आणि जनतेचं आभार मानणार आहे. ‘
Visit : Bahujannama.com