सातारा : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेवरून जोरदार वाद सुरु आहे. निकाल लागून आठवडा उलटला तरी महायुतीला स्थिर सरकार स्थापन करता आले नाही. त्यात आता उदयनराजे भोसले यांनी नवीनच प्रस्ताव मांडला आहे. रामदास आठवले यांच्या मागणीप्रमाणे त्यांनाच मुख्यमंत्री करा असा खोचक सल्ला उदयनराजे यांनी दिला आहे.
शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रिपदावरुन चढाओढ सुरु आहे. इतके दिवस उलटूनही एकमत होत नसल्याने विरोधी पक्षाकडून रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करा अशी मिश्किल टिपणी करण्यात आली होती. त्यावर रामदास आठवलेंनीदेखील मला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यास मी चांगलं काम करेन असं म्हटलं होतं.
आठवले पुढे म्हणाले कि, माझ्या पक्षाने निवडणुकीत जास्त जागा मिळविल्या नाहीत, तरी या सगळ्यात माझं नाव घेतलं जात आहे. तरी मी केंद्राच्या मंत्रिमंडळात खुश आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन हेण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी आठवले यांनी व्यक्त केला.