परीक्षार्थ्यांना सहाव्या सेमिस्टर ऐवजी पाचव्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमावरील प्रश्नपत्रिका दिल्याने उडाला गोंधळ
नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – परीक्षा विभागाचे प्रमुख रवी सरोदे असून त्यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण परीक्षा विभाग चालत असते पण अनेक वेळा त्यांच्या कारकिर्दीत परीक्षा विभागाचा सावळा गोंधळ दिसून आला आहे.त्या विभागाकडे त्यांचे जातीने लक्ष नसल्या मुळे विद्यार्थांना त्रास भोगावे लागत आहे.
सविस्तर वृत्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने बी ए ,बी.कॉम. प्रथम,द्वितीय,तृतीय वर्षाच्या परीक्षा सुरू असून, शुक्रवारी बी कॉम तृतीय वर्षे अंकेक्षण-२ (आॅडीटींग-२) या विषयाची सहाव्या सेमिस्टरची परीक्षा होती. मात्र परीक्षार्थ्यांना पाचव्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमावरील प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ उडाला. नांदेड, लातूरसह विद्यापीठाच्या कक्षेतील सर्वच केंद्रांवर हा प्रकार घडला. दरम्यान, तब्बल दीड तासानंतर प्रश्नपत्रिका बदलून देण्यात आली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड १० ते १२ च्या या २ तासाच्या वेळेत बी.कॉम. तृतीय वर्षाच्या आॅडिटिंग-२ या विषयाची सहाव्या सेमिस्टरची परीक्षा होती. मात्र त्यांना पाचव्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका देण्यात आली. हे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधितांना ही माहिती दिली. त्यानंतर विद्यापीठाने दीड तासानंतर प्रश्नपत्रिका बदलून दिली. दरम्यानच्या काळात परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला. विशेष म्हणजे बदलून दिलेल्या प्रश्नपत्रिकेतही शेवटचा प्रश्न ५ व्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमावरच विचारला होता. शिवाय, प्रश्नपत्रिकेत अनेक चुका होत्या, असेही परीक्षार्थींनी सांगितले. या भोंगळ कारभारामुळे परीक्षार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आशा ह्या चालणाऱ्या कारभाराकडे कुलगुरू उद्धव भोसले साहेब काय बद्दल करतील ह्या कडे सर्वांच्या लक्ष वेधून आहे.
ReplyReply allForward |