बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारने आणि राज्य सरकाने नव्याने लागू केलेल्या मोटार वाहन कायद्यातील नियमांनी शहरांमधील वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आता एक्सप्रेस वेवर देखील दोन्ही लेनवर लवकरच ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसिवण्यात येणार असून, मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक नियमांचे फलक लावले जाणार आहेत. पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर उभारण्यात येणाऱ्या इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टमसह (आयटीएमएस) विविध अत्याधुनिक यंत्रणांचाही समावेश करण्यात आला आहे.
वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे ‘एक्स्प्रेस वे’वर मोठ्या संख्येने अपघात होतात. त्यामुळे एक्सप्रेसवेवरील वांहनांचा वेग तपासणे, लेन कटिंगवर नजर ठेवणे, नंबर प्लेटचा ऑटोमॅटिक फोटो काढणे अशी विविध वैशिष्ट्ये असलेले सुमारे अडीचशे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अवजड वाहनांचे वजन मोजण्याची यंत्रणा आणि हवामानाची माहिती देणारे ‘सेन्सर पोल’ आदी वैविध्यपूर्ण गोष्टींचा समावेश यात करण्यात आला आहे. एक्सप्रेसवेवर दोन दिवसापुर्वी झालेल्या अपघातात पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरचा मृ्त्यू झाला. त्यामुळे एक्सप्रेस वेवरील सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अभिनेता अक्षय पेंडसेचा पुणे -मुंबई एक्सप्रेसवेवर प्रवासादरम्यान अपघाती मृ्त्यू झाल्यामुळे त्याचा भाऊ तन्मय पेंडसे यांनी एक्स्प्रेस वे’वर सुरक्षित वाहतुकीसाठी अभ्यास करून ‘व्हिडिओ सर्व्हिलन्स’ची योजना मांडली होती. त्याच धर्तीवर पुढे ‘एक्स्प्रेस वे’वर ‘आयटीएमएस’ उभारण्याचा निर्णय झाला होता.
दरम्यान राज्य सरकारने ‘एक्स्प्रेस वे’वर ‘आयटीएमएस’ बसविण्याचा प्रस्तावाला त्याला मान्यता दिली असून त्याची निविदा प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. चार नोव्हेंबरपर्यंत निविदा स्वीकारण्यात येणार आहेत. यानुसार ‘एक्स्प्रेस वे’च्या दोन्ही लेनवर वैविध्यपूर्ण कॅमेरे, स्पॉट स्पीड डिटेक्शन सिस्टीम, अॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टम, लेनची शिस्त मोडणे, चुकीच्या दिशेने एंट्री, जनरल सर्व्हिलन्स, डोम कॅमेरे, स्थिर कॅमेरे, ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे असे अडीचशेहून अधिक कॅमेरे बसविले जाणार आहेत. याशिवाय महामार्गांवर अनेकदा ओव्हरलोडेड वाहनांनामुळे अपघात होणारे अपघात आणि घाट क्षेत्रामध्ये वाहनांची कोंडीची समस्या कमी करण्यासाठी ‘एक्स्प्रेस वे’वरील टोल नाक्यांवर मालवाहतुकीच्या वाहनांचे ‘वजन’ तपासण्याची यंत्रणा उभारली जाईल. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या मालवाहू वाहनांवर कारवाई शक्य होईल.
visit : bahujannama.com