पालघर : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातले आदिवासी हे महाराष्ट्राच्या जनतेचा अविभाज्य भाग आहेत. त्यांची वेगळी भाषा आहे, स्वत:ची अशी संस्कृती आहे परंतु सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पामुळे आदिवासी मोठ्या सर्वाधिक विस्थापित होतात आणि त्यांच्या संस्कृतीवर घाला घेतला जातो. विविध प्रकल्पांतर्गत विस्थापितांना डावललेल्या अनुसूचित जमातीच्या समाजाची दखल घेऊन त्यांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येईल, असे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष अनुसया उईके यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या अध्यक्षा अनुसया उईके या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रकल्प बाधित नागरिक व सामाजिक संघटनांची भेट घेऊन संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पालघर जिल्ह्यात येऊ घातलेले बुलेट ट्रेन, वाढवण बंदर यामुळे विस्थापित लोकांना न्याय दिला जाईल, असे यावेळी त्यांनी सांगितले तसेच जिल्ह्यातील पाणी इतरत्र वळवल्यामुळे येथील क्षेत्र सिंचनातून बाद झाले आहे. त्यामुळे उपेक्षित आणि बाधित झालेले शेतकरी यांच्या समस्यांची योग्य दखल घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकारण केले जाणार आहे.
या नियोजित दौऱ्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या उपाध्यक्षा अनुसया उईके, सदस्य एच. के. दामोर, माया इवनाते, संशोधन अधिकारी दीपिका खन्ना, सहाय्यक संचालक सुधीर अत्राम, आर. के. दुबे, कायदे सल्लागार विकासकुमार शर्मा आदी उपस्थित होते.