नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – १९२० साली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते. त्यावेळी ते पाक्षिक म्हणजे समाजजागृतीच्या आंदोलनाचे सर्वात मोठे साधन ठरले होते. मात्र आजची परिस्थितीही भीषण आहे, त्यामुळे त्या समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज आहे. असे ज्येष्ठ आंबेडकरी कवी इ.मो. नारनवरे यांनी म्हंटले आहे.
३१ जानेवारी १९२० रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. चालू वर्षात त्याला ९९ वर्षे पूर्ण झाले आहेत. पुढच्या येणाऱ्या वर्षात त्याला १०० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन मुव्हमेंट तसेच मुक्तिवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मूकनायक शताब्दी वर्ष समारोह आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान गुरुवारी या समारोहाची सुरुवात संविधान चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली. त्यावेळी, मूकनायक या पाक्षिकाच्या पहिल्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखाचे सामूहिक वाचन करून त्यावर चिंतन करण्यात आले. डॉ. आंबेडकरांनी पहिल्या अग्रलेखात सांगितलेल्या गोष्टी आणि दिलेला इशारा आजही तंतोतंत लागू होतो. तेव्हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्याचा अभ्यास करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करावी, असे आवाहन नारनवरे यांनी केले.
इतकेच नव्हे तर, १९२० साली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते. त्यावेळी ते पाक्षिक म्हणजे समाजजागृतीच्या आंदोलनाचे सर्वात मोठे साधन ठरले होते. मात्र आजची परिस्थितीही भीषण आहे, त्यामुळे त्या समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज आहे. असेही त्यांनी म्हंटले.
याचबरोबर त्यावेळी, नरेंद्र शेलार यांनीही आवळे मनोगत व्यक्त केले. दरम्यान, बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मूकनायक या पाक्षिकाच्या शंभराव्या वर्षसमारोहानिमित्त वर्षभर अभियान चालवण्याचे ठरवले आहे. मूकनायक सुरू करून बाबासाहेबांनी समाजरचनेच्या बदलाचे आव्हान केले होते. त्या माध्यमातून त्यांनी समाज पुनर्रचनेची विचारधारा या देशात रुजवण्याचे कार्य केले. सामाजिक पुनर्रचनेचाचा बाबासाहेबांनी केलेला तो प्रारंभिक हस्तक्षेप होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सुधीर भगत, भोजराज हाडके, का.रा. वालदेकर, नरेश वाहाणे, विलास भोंगाडे, बबन चहांदे, आ. हेमंत नागदिवे, एन.एल. नाईक, प्रवीण कांबळे, सेवक लव्हात्रे, सुधीर ढोके, गोविंद वाघमारे, राजकुमार वंजारी, अनिल वासनिक, संजय गोडघाटे, नामदेवराव खोब्रागडे, शिवचरण थूल आदी उपस्थित होते.