पोलीसनामा ऑनलाईन टीम : Maan Lakshmi Ki Puja : प्रत्येक व्यक्तीला लक्ष्मी मातेची कृपा हवी असते, कारण लक्ष्मी मातेच्या कृपेनेच व्यक्तीला धन-धान्य, सुख-समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. अनेक अशा व्यक्ती सुद्धा असतात ज्यांना खुप मेहनत करूनही धन, सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होत नाही. तर काही अशा व्यक्ती सुद्धा असतात ज्यांना खुप कमी मेहनतीत सर्वकाही मिळते. अशा व्यक्ती ज्यांना खुप मेहनत करूनही हवे ते मिळत नाही, त्या व्यक्तींनी हा उपाय आवश्य केला पाहिजे.
उपाय :
धार्मिक दृष्टीने हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्ताचा काळ खुप महत्वपूर्ण मानला जातो. कारण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या या दोन्ही वेळा संधिकाळ असतो. यासाठी सायंकाळ होताच जर हे उपाय केले गेले तर लक्ष्मी मातेची कृपा होते, ज्यामुळे व्यक्तीच्या आर्थिक अडचणी दूर होऊन धन-धान्य आणि सुख-समृद्धीची प्राप्ती होते.
1 हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खुप पवित्र मानले जाते. असेही म्हटले जाते की, ज्या घरात तुळशीची रोज पूजा होते, त्या घरात लक्ष्मी मातेची विशेष कृपा होते. परंतु, तुळशीबाबत धर्मशास्त्रात असे सुद्धा म्हटले गेले आहे की, जर कुणी संध्याकाळी तुळशीला स्पर्श केला तर यामुळे लक्ष्मी माता नाराज होते आणि घरात आर्थिक समस्या निर्माण होते. यासाठी संध्याकाळनंतर कधीही तुळशीला स्पर्श करू नका.
2 लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी तुळशीच्या रोपाजवळ रोज तूपाचा दिवा लावा. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि व्यक्तीला धन-धान्य आणि ऐश्वर्य प्रदान करते.