बहुजननामा ऑनलाइन टीम : काल रविवारच्या दिवशी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेता होताच देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी फडणवीस म्हणाले की, मेरा पाणी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मै समंदर हू लौटकर जरूर आऊंगा. मी पुन्हा येईनच्या टोल्याला त्यांनी या शायरीत प्रतीउत्तर दिल. विरोधी पक्षात राहणे हा आमचा डीएनए आहे हिताचं काम करण्यासाठी नक्कीच मदत करू.
सत्ताधाऱ्यांकडून मी पुन्हा येईल असं म्हणणाऱ्यांनी टाईमटेबल सांगितले नव्हते अशा प्रकारचा खोचक टोला लगावण्यात आला होता. याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी शायरीचा वापर केला मात्र हा शायरीचा थेट संबंध हा गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आहे. २०१० मध्ये ज्यावेळी अमीत शहा यांना अटक झाली होती त्यावेळी सुद्धा त्यांनी गुजरातच्या विधानसभेत हीच शायरी म्हटली होती आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तीच शायरी म्हंटली आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये अमित शहा हे जेलबाहेर आले होते. त्यावेळी काँग्रेसचे पी. चिदंबरम हे गृहमंत्री होते. अमित शहा ज्यावेळी देशाचे गृहमंत्री झाले त्यावेळी माजी गृहमंत्री झालेले पी चिदंबरम हे जेलमध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, आंबेडकर ही नावे वंदनीय आहेतच परंतू, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ज्या पद्धतीने शपथ घ्यायला सांगितले आहे त्याचे पालन व्हायला हवे असे फडणवीस यांनी सांगितले. तुम्ही कितीही चिडलात, रागवलात तरीही मी नियमाला धरुनच काम करत राहणार असे म्हणून फडणवीस यांनी भाजपावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.
Visit : bahujannama.com