मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मुंबईच्या महापौरांचा बंगला घेण्यात आला होता. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक मात्र, अद्याप स्मारकाचे कोणतीही चालू होत नसल्याने मनसेने शिवसेनेला प्रश्न विचारले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना-मनसे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. शिवसेना नेते संदीप देशपांडे यांनी याविषयी ट्विट केलं होतं.
तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी हस्तांतरित करण्यात आला होता. परंतु मागील तीन वर्षात तिकडे कोणतीही हालचाल नाही बंगला बंदिस्त अवस्थेत ठेवण्यात आला आहे ही खाजगी मालमत्ता संपत्ती नसून बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक काय झालं हे जनतेला सांगावं असं आव्हान त्यांनी शिवसेनेला केलं होतं. यावर ज्यांनी त्यांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर बोलू नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला.
पुढे भाजपावर टीका करत राऊत म्हणाले, आम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वामी विवेकानंद आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत. जेएनयू नाव बदलल्याने काय होणार पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे अभिमान आणि गौरव त्यामुळे फक्त द्वेष भावनेतून नाव बदलणे राजकीय हेतूने प्रेरित असं हे ठीक नाही असं त्यांनी सांगितलं. शिवसेनाप्रमुखांना मी फक्त देहाने निरोप दिला; मात्र त्यांचा आत्मा हिंदुत्व विचार आणि मराठा बाणा हे सगळे आमच्या सोबत कायमस्वरूपी आहे. आजही देशाचं राजकारण भूमिपुत्र, बेरोजगार या दोन विषयावर केंद्रित आहे. बाळासाहेबांनी ५५ वर्षांपूर्वी हा विषय मांडला होता. आज देशात सगळं राजकारण याच विषयावर आहे. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे. यापुढेही राहील असं संजय राऊत म्हणाले.
त्यांच्या प्रेरणा सतत आमच्या सोबत राहतील
गेल्या वर्षी या काळात सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरू होती. लोकांच्या मनात शंका होत्या; मात्र यंदा बाळासाहेबांच्या स्मृती सोहळा वर्षी शिवसेनेचा मुख्यमंत्री तोसुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपाने मानवंदना द्यायला आली. बाळासाहेब ठाकरे आमच्यातसोबत सतत आहेत. त्यांच्या प्रेरणा सतत आमच्या सोबत राहतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.