नवी दिल्ली : या नवीन वर्षात तुम्हाला आणखी एक फटका बसणार आहे, कारण तुमच्या फोनचे बिल वाढणार आहे. टेलीकॉम कंपनी वोडाफोन-आयडिया (व्हीआय) आणि एयरटेल आपल्या टेरिफच्या किमती 15 ते 20 टक्के वाढवण्याचे प्लॅनिंग करत आहेत. इकोनॉमिक्स टाइम्सच्य रिपोर्टनुसार वोडाफोन-आयडिया आपला तोटा कमी करण्यासाठी या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढल्या वर्षीच्या सुरूवातीला टॅरिफच्या किमतीमध्ये 15 ते 20 टक्के वाढ करू शकतात, कारण रिलायन्स जिओ आणि एयरटेलमुळे यांचे ग्राहक कमी होत चालले आहेत.
भारती एयरटेलसुद्धा वोडाफोन-आयडियाच्या मार्गावर जाऊ शकते. परंतु दोन्ही कंपन्या आपल्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओच्या डेटानुसार टॅरिफ रेट्स चेंज करतील.
इकॉनॉमिक टाइम्सने म्हटले आहे की, कंपन्या आपले टॅरिफचे रेट्स रेग्यूलेटरद्वारे फिक्स केल्यानंतर सुद्धा वाढवू शकतात. एका अन्य सूत्राने सांगितले की, व्हीआय डिसेंबरच्या सुरूवातीला किंमतीमध्ये वाढ करू शकते. मात्र, कंपन्या टॅरिफच्या किमतीमध्ये 25 टक्केपर्यंत वाढ करण्याची प्लॅनिंग करत आहेत. परंतु लोकांचे म्हणणे आहे की, यास एकदाच लागू करता येणार नाही.
पहिल्यांदा व्हीआय आल्यानंतर केली वाढ
देशातील टेलीकॉम कंपन्यांनी मागील वर्षात डिसेंबरमध्ये टॅरिफ रेट्समध्ये वाढ केली होती. तर पहिल्यांदा कंपन्यांनी 2016 मध्ये रिलायन्स जिओ आल्यानंतर रेट्स वाढवले होते. सप्टेंबर तिमाहीच्या शेवटी व्हीआयचा अॅव्हरेज रेव्हेन्यूवर यूजर (एआरपीयू) 119 रुपये जो भारती एयरटेलच्या एआरपीयू (162 रुपये) आणि जिओच्या एआरपीयू (145 रुपये) च्या पाठीमागे आहे.
काय म्हणाले व्हीआय आणि एयरटेलचे एमडी आणि सीईओ
व्हीआयचे एमडी रविंद्र ठक्कर यांनी अगोदरच सांगितले आहे की, सध्या असलेल्या टॅरिफनुसार दरासोबत काम करणे अवघड आहे आणि ते हे वाढवण्यास मागेपुढे पहाणार नाहीत. त्यांनी दुसर्या तिमाहीत आलेल्या परिणामानंतर अॅनालिस्टला म्हटले की, डेटा रेट्सबाबत सुरू असलेल्या विचारविनिमय कुणालाही टॅरिफचे दर वाढवण्यापासून रोखू शकत नाही. मात्र त्याची वेळ योग्य असली पाहिजे, परंतु आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की, टॅरिफ रेट्सच्या वाढीचा निर्णय आता दूर नाही. तर भारती एयरटेलचे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी म्हटले की, ते अगोदर किंमत वाढवणारे पहिले ऑपरेटर नसतील. परंतु, त्यांनी हे देखील म्हटले की, सध्याचे रेट्स मोठ्या कालावधीपर्यंत चालवले जाऊ शकत नाहीत.