नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हातील चिपळूण येथील मराठमोळ्या व्यक्तीची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे . माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांची जागा रिक्त होणार असून त्यांच्या जागेवर सुमित्रा महाजन यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
सुमित्रा महाजन यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळून येथे झाला त्यांच कुटुंब काही वर्षांपूर्वी मुंबईत येऊन स्थायिक झालं. इंदूरचे जयंत महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या इंदूरमध्येच स्थायिक झाल्या. त्यांनी आजपर्यंत १९८९ ते २०१४ पर्यंत सलग आठ वेळा इंदूर मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं नाही. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी सुमित्रा महाजन यांची निवड झाली तर मराठी भाषिक आणि याच राज्यात जन्मलेल्या त्या महाराष्ट्राच्या पहिल्या राज्यपाल ठरतील.