नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन दिवसानंतर म्हणजेच 1 मार्च 2020 पासून बरेच मोठे बदल होणार आहेत. हे नवीन बदल थेट सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. जर तुमचे एसबीआयमध्ये खाते असेल तर त्याचा परिणाम तुमच्यावर होणार आहे. केवायसी नसल्यामुळे बँक खाते बंद केले जाऊ शकते. या व्यतिरिक्त 2,000 हजार रुपयांच्या नोटा हळूहळू बंद करणे आणि एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी, जीएसटी परिषदने देखील लॉटरीला जोडलेल्या टॅक्समध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता, जो 1 मार्चपासून अंमलात येणार आहे.
जर तुमचे एसबीआयमध्ये खाते असेल तर तुम्हाला केवायसी करणे आवश्यक आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना याबाबत एसएमएस पाठविला आहे, ज्यामध्ये केवायसी 28 फेब्रुवारीपर्यंत करण्यास सांगितले आहे. असे केले नाही तर या तारखेनंतर खाते बंद होऊ शकते. केवायसीसाठी मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा कार्ड, टपाल कार्यालयातून जारी केलेले ओळखपत्र, पेन्शन पेमेंट ऑर्डर, टेलिफोन बिल, वीज बिल, बँक खात्याचा तपशील, रेशन कार्ड, क्रेडिट कार्ड तपशील, सेल डीड / लीज करार, बँक कागदपत्र सादर करावे लागेल.
1 मार्च 2020 पासून लॉटरी लावणाऱ्यांना 28 टक्के दराने जीएसटी लागेल. महसूल विभागाच्या नवीन नियमांनुसार लॉटरीवर केंद्रीय कर दर 14 टक्के करण्यात आला आहे आणि राज्य सरकारही त्याच दराने कर वसूल करतील. यामुळे, 1 मार्चपासून लॉटरीवरील एकूण जीएसटी 28 टक्के असेल. डिसेंबर 2019 मध्ये, जीएसटी कौन्सिलने राज्य सरकारद्वारे चालविलेल्या आणि मान्यता असलेल्या लॉटरींवर 28 टक्के एकसमान दराने जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.
आरबीआयने एटीएम कार्ड अर्थात डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियम जारी केले आहेत. तसेच बॅंकांना भारतात कार्ड देताना फक्त एटीएम आणि पॉईंट ऑफ सेलमध्ये फक्त घरगुती कार्डे वापरण्यास परवानगी देण्यास सांगण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी ग्राहकांना स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल. याव्यतिरिक्त, कार्डवरील सेवा स्वतंत्रपणे सेट कराव्या लागतील. नवीन नियम 16 मार्च 2020 पासून नवीन कार्डवर लागू होतील. याअंतर्गत, जुन्या कार्डे ठेवणारे ग्राहक कोणती सुविधा थांबवायची आणि कोणती सुरू करावी हे ठरवू शकतात. ग्राहक त्यांच्या व्यवहाराची मर्यादा दिवसाचे 24 तास, कोणत्याही वेळी सात दिवस बदलू शकतात.