मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होत आहे. तर राज्यात ३१ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात झाली होती. आणि फक्त मुंबईमध्ये ५ हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. वारंवार रुग्ण संख्येत वाढ होत असतानाच काही शहरात शासनाने लॉकडाऊन लागू केले आहे. तर मुंबईमध्ये लोकल ट्रेन आणि लॉकडाऊनसंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
अतिरिक्त आयुक्त काकाणी म्हणाले, सध्या लॉकडाऊनचं कोणतंही वृत्त आमच्या चर्चेत नाही. चाचण्या वाढवने, पायाभूत सुविधा वाढवने, आणि लसीकरणाचा वेग वाढवने या ३ गोष्टींवर आमचं लक्ष आहे, यावर आम्ही लक्ष देत आहोत. निश्चितच यात आम्हाला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच रेल्वे स्थानकांवर आम्ही पथक तयार केली आहेत. बाहेरून येणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्यासाठी आम्ही ही पथकं नेमली आहे. लोकल ट्रेन सध्या ज्या क्षमतेनं सुरू आहेत ती कायम राहिल हा आमचा प्रयत्न आहे. ती कमी करण्यावर आमचा कोणताही विचार नाही. परंतु शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, खासगी कार्यालयांत ५० टक्के उपस्थितीत असावी. सर्वांनी या नियमाचं पालनं करावं, जेणेकरून लोकलमध्ये होणारी गर्दी काही प्रमाणात कमी होईल, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी माहिती दिली आहे.
कोरोना संसर्गापासून प्रथमच अधिक प्रमाणात रुग्णवाढ –
बुधवारी चोवीस तासांमध्ये मुंबईमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच, ही सर्वाधिक रुग्णवाढ असून कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. सध्या मुंबई एकून साडेतीस हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह केसेस असून रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के इतका आहे. सध्या राज्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ८४ दिवस असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.