मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हंटले होते कि ,” भारतामध्ये मुस्लिमांचा हिस्सा हा बरोबरीचा आहे. आम्ही काही देशात भाडेकरू राहत नाही ” असा भाजपवर वार केला होता त्यावर आता भाजपने प्रत्युत्तर देत असदुद्दीन ओवेसी यांना खडे बोल सुनावले आहेत .भारत आणि पाकिस्तान फाळणी १९४७ मध्ये झाली तेव्हाच तुमचा हिस्सा दिला आहे, अशा शब्दांत भाजपने पलटवार केला आहे.
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यानंतर भाजप नेते माधव भंडारी यांनीही ओवेसी यांना प्रत्युत्तर दिले आहे. मुस्लिमांना कुणीही भाडेकरू म्हटलेले नाही. मात्र जर ते हिस्सेदाराची भाषा करणार असतील तर १९४७ मध्येच त्यांना त्यांची हिस्सेदारी मिळाली आहे, असे भंडारी म्हणाले. काही जण चारितार्थ चालवण्यासाठी उलटसुलट वक्तव्ये करतात. धर्म, जातीच्या नावावर ते बेताल बडबड करतात. यामुळे कुणाचाच फायदा होत नाही. त्यांनी जबाबदारीने बोलावे, असेही भंडारी यांनी म्हंटले आहे.यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात हे बघावे लागेल .