प्रतापगढ : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर जोरदार निशाणा साधला आहे त्या म्हणाल्या कि,“मी नरेंद्र मोदी यांच्यासारखा घाबरट आणि दुबळा पंतप्रधान माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये पहिला नाही. राजकीय शक्ती ही मोठ -मोठ्या निवडणूक सभा घेऊन आणि सतत टीव्हीवर झळकून प्राप्त होत नसते तर जनता ही सर्वोच्च शक्ती आहे त्यातूनच राजकीय शक्ती प्राप्त होते ,जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यात खरी राजकीय शक्ती असते .आपल्यावर करण्यात येणाऱ्या टीकेला स्वीकारण्याची शक्ती, विरोधकांची भूमिका जाणून घेण्याची शक्ती यातच खरी राजकीय शक्ती दडलेली असते. पंतप्रधान मन कि बात ऐकवतात पण लोकांची मन कि बात ते कधी समजून घेणार असा सवाल प्रियंका गांधींनी विचारला
काल दिल्लीमध्ये एका रोड शोला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. देशात लोकसभा निवणुकांचे दोन टप्पे शिल्लक आहेत त्यात प्रियंका गांधी यांनी भाजपा सरकारला आवाहन करत नोटाबंदी,जीएसटी आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लढा आणि सत्तेत येताना देशातील तरुणांना तुम्ही जी खोटी आश्वासने दिलीत त्यावर निवडणूक लढा,असं खुलं आव्हान दिलं .