बहुजननामा ऑनलाईन – राज्यात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 24 हजार 8886 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 लाख 15 हजार 681 एवढी झाली आहे. आज दिवसभरात 393 जणांचा मृत्यू झाला. तर राज्यात शुक्रवारी 14 हजार 804 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्व रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 7 लाख 15 हजार 681 रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात गेल्या 24 तासात 393 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 28 हजार 724 इतकी झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यू दर हा 2.83 टक्के आहे. राज्यात सध्या 2 लाख 71 हजार 566 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, देशातही रुग्णांनी अतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. एकाच दिवसात तब्बल 96 हजार 551 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. नवीन कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता लवकरच देशात 1 लाख रुग्ण संख्याही नोंदवली जाऊ शकते. एवढेच नाही तर आज 1209 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 45 लाख 62 हजार 414 इतकी झाली आहे. तर देशात 9 लाख 43 हजार 480 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर आतापर्यंत 76 हजार 271 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 35 लाख 42 हजार 663 लोक निरोगीही झाले आहेत.