तुळजापूर बहुजननामा ऑनलाईन – संबंध जगाला ,समता ,स्वातंत्र्य ,न्याय ,बंधुतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांनी मानवजातीच्या कल्याणासाठी गृहत्याग केला. समता ,स्वातंत्र्य ,न्याय ,बंधुता अशा प्रकारची बलशाली विचारधारा तथागत गौतम बुद्धांनी जगाला दिली. याच विचाराने विचार बदलतात ,बदलाने बदल होतो ,कारण मानव जातीचे विचार बदलणे फार महत्वाचे आहे ही काळाची गरज आहे आणि हाच बदलाव घडून आणण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्धांच्या विचारातून सर्वात महान व सर्वात मोठे संविधान तयार केले म्हणून आज आज देशात समानता ,स्वातंत्र्यतता आणि अखंडता टिकून आहे.
असे जर झाले नसते तर आजही समाज गुलामगिरीच्या बंधनात अडकलेला असता. असे प्रतिपादन पुणे येथील संशोधक अधिकारी तथा धम्मसेवक ,एस .सी विद्रोही साहित्यिक टी .डी गायकवाड यांनी केले. ते यावेळी मौजे वागदरी ता. तुळजापूर येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करते वेळी कार्यक्रमाचे प्रमुख ते बोलत होते. हा कार्यक्रम दि. ३ जुलै २०१९ रोजी करण्यात आला .
प्रमुख पाहुणे माजी मंत्री मधुकर चव्हाण ,जी .प सदस्य महेंद्र काका दुर्गुडे , दिलीप भालेराव ,दिलीप सोमवंशी , बौद्धाचार्य एस .के गायकवाड ,ज्ञानेश्वर बिराजदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस .के गायकवाड यांनी केले. तर वाघमारे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला मौजे वागदरी परिसरातील बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.