नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – बहुचर्चित तिहेरी तलाक विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी मंजुरी दिली आहे. या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याने आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे.
लोकसभेत हे विधेयक पास झाल्यानंतर बुधवारी ते राज्यसभेत मांडण्यात आले होते. भाजपाचे संख्याबळ पाहता हे विधेयक त्यांना राज्यसभेत पास करणे अवघड जाईल असे वाटत होते. मात्र मात्र, ९९ विरुद्ध ८४ मतांनी या विधेयकाला मंजूर मिळाली. त्यानंतर ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते.
राज्यसभेत बहुमत नसतानाही हे विधेयक पास झाल्याने मोदी सरकरचे हे मोठे यश मिळा ल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विरोधकांच्या भुमिकेमुळे हे विधेयक पास झाल्याचा आरोप एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. तसेच विरोधकांचे मुस्लिम प्रेम हा केवळ दाखावा असल्याचे ओवेसी म्हटले होते.
राज्यभेत डीटीपी, टीआरएस, जदयू, पीडीपी, अद्रमुक या पक्षांनी राज्यसभेत या विधेयकाच्या मतदानावेळी बहिष्कार टाकला होता. यापुर्वी डिसेंबर 2017 मध्ये लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी मिळाली होती. मात्र राज्यसभेत भाजपकडे बहुमत नव्हते. तसेच या विधेयकला काँग्रेसने व इतर विरेधी पक्षांनी विरोध केला होता. त्यामुळे मोदी सरकारने या तिहेरी तलाकचा कायदा करण्यापेक्षा अध्यादेश काढला होता. मात्र आता या अध्यादेशाचे त्यांनी कायद्यात रुपांतर केले आहे.
तिहेरी तलाक या विधेयकाला मंजुरी मिळाल्याने पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला कारावासाची शिक्षा होणार आहे.