बीड : बहुजननामा ऑनलाईन – संबंध महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना युती सरकारमधील नेते मंत्रालयात बसून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत तर दूसरीकडे आदरणीय पवार साहेब वयाच्या पंचाहत्तरीतही शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. दुष्काळ असो किंवा अन्य कोणतिही नैसर्गिक आपत्ती असो आघाडी सरकारने कधीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याच काम केलं नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले कि,महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पार पडताच पवार साहेब महाराष्ट्रातील दुष्काळ असणाऱ्या भागाचा दौरा करण्यासाठी निघाले होते .शेतकरी ,युवक, शेतमजूर, कामगार यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना त्यांच्या अडचणी समजून त्यांच्यासोबत चर्चा करू लागले .अशा वेळी विरोध करायचा म्हणून सत्ताधाऱ्यांकडून पवार साहेबांवर टिका करण्यात येत आहे .सर्वसामान्यांच्या वाईट काळात त्यांच्यासोबत राहणं हे राजकारण असू शकत का?हे तुह्मीच सांगा असा सवाल रोहित पवार यांनी विचारला .
पवार साहेबांनी दुष्काळी दौऱ्यात सहभागी होवून फक्त समस्या समजून घेतल्या नाहीत तर त्यावर असणाऱ्या उपाययोजना तसेच शासकिय पातळ्यांवर कोणत्या निर्णयांची आवश्यकता आहे असे अनेक विषय समजून घेण्यात आले. संपुर्ण परिस्थिती पाहून दुष्काळावर तातडीची मदत म्हणून माण तालुक्यामध्ये माझ्या कंपनीमार्फत ३० पाण्याच्या टँकरची सोय देखील करण्यात आली असल्याचेही रोहित पवार म्हणाले .