जालना बहुजननामा ऑनलाईन – धामणा धरणाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या व अन्य मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीने दिनांक ८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
धामणा धरणाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून कारवाई करण्यात यावी जिल्ह्यातील सर्व धरणे आणि लघु मध्यम प्रकल्पाची दुरुस्ती करण्यात यावी, धामणा धरणग्रस्तांसह धरणाखाली धोका असणाऱ्या कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे. पिक विमा कंपनीकडून वाटप करण्यात आलेले पीक विम्याचे अर्ज न वाटता खाजगी सोसायटी मार्फत पिक विम्याचे अर्ज विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत ,जिल्हाधिकारी तसेच सरकारची आणि पिक विमा कंपनीची परवानगी न घेता खाजगी पिक विमा अर्ज छापून त्याची शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके ,चोखाजी सौंदर्य ,गौतम खंडागळे ,अकबर इनामदार , कैलास रत्न पारखे ,दीपक घोरपडे ,विष्णू खरात , शपिक आतार ,विजय लहाने ,परमेश्वर खरात ,देविदास काळे ,प्रदीप जोगदंड ,विनोद दांडगे ,शिवाजी दाभाडे ,बबन जाधव ,आदी सहभागी झाले होते.