बहुजननामा ऑनलाइन टीम – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. (targeted Thackeray government)त्यांनी बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा देखील घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार तर मुख्यमंत्र्यांच्याही पुढे गेले. त्यांनी बागायतदारांना दीड लाख रुपयांची मदत देऊ असे म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाल नाही. राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस( leader of opposition Devendra Fadnavis) यांनी शेतकरी प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ( Chief Minister Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.
पुण्यात शेतकरी संवाद यात्रेदरम्यान फडणवीस पुण्यात बोलत होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात मदत दिली जात आहे. मात्र राज्य सरकार पीक विमा कंपनीदेखील अपॉईंट करू शकले नाही. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसेच मिळाले नाहीत. राज्यात भाजपचे सरकार असताना चार वर्ष प्रधानमंत्री पीक विमा योजना व्यवस्थित राबवण्यात आली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. मात्र आता सत्तेत असलेेले महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला.
तसेच आम्ही केलेल्या कर्जमाफीला नाव ठेवत महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीची योजना तयार केली. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आम्ही केलेल्या कर्जमाफीचा लाभ 42 लाख शेतकऱ्यांना झाला होता. मात्र यांची कर्जमाफी 29 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला होता. यांनी मात्र प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.