सांगली : बहुजननामा ऑनलाईन – वर्षानुवर्षे वंचित राहिलेले घटक सत्तेत येऊन क्रांती घडवू शकतात. त्यांना आणण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुकूमार कांबळे यांनी इस्लामपूर येथे केले. एआयएमआयएम व भारिप बहुजन महासंघ वाळवा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वंचित आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाकिर तांबोळी, ‘बळीराजा’चे बी. जी. पाटील, सोलापूर गटनेते तौफिकभाई शेख, नामदेवराव करगणे, वसंत कांबळे, नानासाहेब वाघमारे, अमोल माने प्रमुख उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. वाळवा तालुका पुर्व भारीप बहुजनचे रोहन धुमाळे उपस्थित होते. अमित वेटम यांनी प्रास्ताविक केले. संदीप कांबळे यांनी आभार मानले.