औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची उत्सुकता कमालीची आहे. ‘एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील हे लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चत असतांना त्यांनी माघार घेतल्यानंतर आघाडीचा दुसरा उमेदवार कोण असणार याची कमालीची उत्सुकता औरंगाबादकरांना लागली आहे.
शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने पाचव्यांदा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर केली. तर काँग्रेस ने विधान परिषदेचे विद्यमान आमदार असलेले सुभाष झांबड याना विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे. झांबडचा ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क असलेल्याने झांबड यांनी प्रचाराची यंत्रणा राबविली आहे.या चुरशीच्या लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडे सर्व महाराष्ट्र्राचे लक्ष लागले आहे.
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले होते. परंतु ‘एमआयएम’ने त्यांच्या नावाला विरोध केल्यानें आघाडीने त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले नाही. सद्यस्थितीत आमदार इम्तियाज जलील आघाडी कडून लढण्याची चर्चा जवळपास थांबली आहे. या आघाडीच्या उमेदवारीसाठी माजी खासदार उत्तमसिंह पवार प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. मात्र , त्यांच्या उमेदवारीवरही निर्णय होऊ शकला नाही.
वंचित बहुजन आघडीनें राज्यभरातील ३७ उमेदवार जाहीर केले आहेत. औरंगाबाद वगळता मराठवाड्यातील सर्व मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले. औरंगाबाद मतदारसंघात कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता कायम आहे. या उमेदवारावर शिवसेना व काँग्रेसच्या राजकीय समीकरणात बरेच बदल होणे अपेक्षित आहे.